रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन केले कौतुक !

 

वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी महिला वेटलिफ्टिंगच्या ४९ किलो वजनी गटात भारताला रौप्यपदक आणि स्पर्धेतील पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून दिलं आहे. चानू यांच्या यशाबाबत देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाचे नाव उंचावणाऱ्या मीराबाई चानू यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून त्यांना शाबासकी दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबाबत मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.’ अशी माहिती पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी लिहतात, ‘भारताची टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील सुरुवात उत्तम झाली. मीराबाई चानू यांच्या विलक्षण कामगिरीमुळे संपूर्ण भारत देश आनंदोत्सव साजरा करतोय. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी रौप्यपदक पटकावल्याबाबत त्यांचे अभिनंदन. त्यांचे हे यश प्रत्येक भारतीयांसाठी स्फुर्तीदायक आहे.’

Team Global News Marathi: