श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं गळा दाबून तिची हत्या केली आहे.श्र द्धाच्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले. ते तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले आणि टप्प्याटप्प्याने तो त्याची विल्हेवाट लावत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. या घटनेप्रकरणी आता अभिनेता आस्ताद काळेने अप्रत्यक्षरित्या संपात व्यक्त केला आहे

आस्ताद काळे सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असून तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. विविध सामाजिक मुद्द्यांवर तो त्याचं मत मांडत असतो. आता त्याने फेसबुक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षरित्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

आस्तादने लिहिलं आहे,”तिचं त्याच्याशी भांडण झालं, त्यात तिचा मृत्यू झाला…”, अशी बामती वाचली. जोडीदाराबरोबरच्या भांडणात चुकून मृत्यू झाला हेच पटत नाही… पुढे जे घडलं ते शत्रूच्या बाबतीतही घडू नये.” आस्तादच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘त्या माणसाली शिक्षा व्हायला हवी’, ‘अशा अनेक श्रद्धा निर्णाण होतच राहणार’, पिढी डोळ्यासमोर उद्धवस्त होत आहे, त्यांना वाचवायला हवं’, अशा कमेंट्स करत नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहे.

Team Global News Marathi: