“शिवसेनेची मानसिकता मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना माहिती”

 

मुंबई | काँग्रसेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट रोजी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत फोन टॅपिंग मुद्दा महत्त्वपूर्ण आहे, ज्याप्रकारे लोकशाहीवर हल्ला होतोय तो महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. महागाईचा मुद्दा आहे. या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. अशी माहिती दिली. तसेच शिवसेनेला तालिबानी म्हणणाऱ्या भाजपावर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, “कोण काय बोलतयं. कोण काय करत यावर शिवसेना बोलत नाही. शिवसेनेची मानसिका काय आहे हे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांना माहित आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी पक्ष आहे. जेव्हा जेव्हा देशातील हिंदुंवर संकट आली तेव्हा तेव्हा शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी छातीचा कोट करुन त्या संकटांशी सामना केला.युद्ध केल. त्य़ाग केला.. बलिदान दिले. बाबरी कोसळत असताना ज्यांनी हात वर केले, त्यांनी आम्हाला तालिबानी म्हणू नये. आम्ही राष्ट्रवादी होतो म्हणून तो कलंक पुसून काढला. असे म्हणत राऊतांनी भाजपावर सडकून टीका केली.

पुढे राऊत म्हणाले की, भारताला तालिबानचा सर्वात मोठी धोका आहे. कारण तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. तालिबानला चीनचे समर्थन आहे. या दोघांमुळे तालिबान वाढतयं, फोफावलयं..अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार आणि अत्याचार करतयं. पाकिस्तान हिंदुस्तानचा किती मोठा शत्रु आहे हे आपल्याला माहिती आहे. अशावेळी आपल्या देशातून तालिबानच्या समर्थनार्थ आवाज उठवला जात असेल तर सरकारने तो जागच्या जागी चिरडून टाकावा असेही राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: