उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार तोंडघशी पडले आहे याच मुद्द्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्र्कर्णात पाटील यांनी मुख्यमंती उद्धव ठाकरे यांच्यवर घणाघाती टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहार अशी टीका पाटील यांनीं केली आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो. परंतु येथे उद्योगपतींच्या घातपाताची व समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती असे सुद्धा पाटील यांनी बौन दाखविले आहे.