नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना, एका कार्यक्रमात मंचावर उपस्थित भाजपच्या नेत्यांकडे पाहून त्यांचा, ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या विधानानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपल्या सोयीनुसार प्रतिक्रिया दिलूया होत्या.
त्यातच आता या विधानावर रिपाई पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास ठेवले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.’उद्धव ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला कंटाळले असावेत, त्यामुळेच कदाचित पुन्हा त्यांना भाजपसोबत यायची इच्छा झाली असावी,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
‘शिवसेना-भाजपने एकत्र यावे, असे मी आधीपासूनच म्हणत आलो आहे. राज्यात युतीचे सरकार आले तर ते राज्याच्याच हिताचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सेनेला काहीच फायदा नाही. त्यांनी युती करावी आणि पुन्हा सत्तेत यावे. काल ठाकरे यांनी हळूच का होईना, पण तसे संकेत दिले आहेत. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, अशाच प्रतिक्रिया सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या. त्यामुळे, हे दोन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल,’ असं ते म्हणाले.