शिंदेंच्या ठाण्यात सेनेच्या सुषमा अंधारेंची गर्जना, केली शिंदे गटाची चांगलीच पोलखोल

 

ठाणे |  शिवसेनेकडून आता प्रबोधन यात्रा सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अर्थात ठाण्यातून सुरु झाली आहे. या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी अतिशय धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी प्रबोधन यात्रा आपण का काढत आहोत? या यात्रेच नेमकं महत्त्व काय? ते सांगितलं.

त्यांच्या भाषणावर शिवसैनिकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. सुषमा अंधेरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत टीका केली. त्यांच्या मन की बात कार्यक्रमाचा उल्लेख करत निशाणा साधला. “जन की बात कब सुनोगे? आम्ही महाप्रबोधन यात्रा का करत आहोत? कारण प्रत्येक जण आपल्या मनातील सांगत आहे. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही ही महाप्रबोधन यात्रा करत आहोत”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. “जे लोक निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही.

तर त्या लोकांनी जनतेचाही विश्वासघात केला. कारण तुम्ही शिक्के जे मारले होते त्या विचारधारा बघून मारले होते आणि नेमके त्या विचारधारेशीच या लोकांनी गद्दारी केली. मग हे विचारधारेच्या वेळेला हे लोक म्हणतात की अरे आम्ही कुठे विचारधारा सोडली? आम्ही बाळासाहेबांचेच विचारधारेचे आहोत. हे लोक बाळासाहेबांचे वारसधार कसे असतील? जे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली इतर धर्मीयांचा द्वेष करतात त्यांना कळत नाही.

र्मवीर आनंद दिघे यांचे सर्वात विश्वासू साथीदार, सहकारी, मित्र, गुरुवर्य ते साबिरभाई शेख सारखे नेते होते. त्या साबिरभाई शेख यांना तुम्ही कसे विसरु शकता? जे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांचे वारसदार, बाळासाहेबांचा वारसदार असणारा माणूस आपल्याच शिवसैनिक भावाच्या विधवा पत्नीच्या विरोधात कसा उमेदवार उभा करु शकतो? तोही दुसऱ्यांचा. एकीकडे शिवसेना वाचवायचं म्हणतात, आणि शिवसेनेचा उमेदवारच देत नाहीयत. पण तरीही यांना घाई फार असते”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Team Global News Marathi: