शिंदे गटात येताच किर्तीकरांचा उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण; म्हणाले,

 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यामुळे, शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्र जाहीर करून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, गजानन किर्तीकर यांनी यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली.

“एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला, एका योग्य मार्गानं शिवसेना नेण्याचा त्यांचा मानस मला स्पष्ट दिसला. शिवसेनेची विचारधारा, बाळासाहेबांची जी विचारधारा आहे, हिंदुत्वाचे विचार आहेत याची जपणूक करून ही संघटना अंगी कारली. त्यात ते मार्गक्रमणही करत आहे, त्यामुळे माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना आपुलकीनं पुढे नेत आहेत, म्हणून मी यात प्रवेश केला,” असं स्पष्टीकरण गजानन किर्तीकर यांनी दिलं.

“आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, त्यांच्यासोबत प्रवास करू नका असं सांगितलं. सगळ्या खासदारांनी सांगितलं. मी हे भाषणातही सांगितलं. सगळ्या खासदारांनी सांगितल्यावरही त्यात बदल झाला नाही. त्यामुळे १२ खासदार गेले. काही बदल होतो का हे पाहण्यासाठी मी थांबलो होतो. समेट करा असंही सांगितलं. दसरा मेळावा इतक्या भव्य प्रणामात होतो, तर या दोन्हींची ताकद एकत्र आली, समेट घडला तर शिवसेना किती मोठी होऊ शकेल,” असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: