शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध

 

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे वक्तव्य देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. केवळ सहकाराचे मॉडेलच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विपणन आणि उत्तम बाजार व्यवस्था देऊ शकते असेही शाह म्हणाले. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ म्हणजेच नाफेडतर्फे भोपाळमध्ये ‘कृषी विपणनातील सहकारी संस्थांची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी अमित शाह बोलत होते.

सहकार मंत्रालय स्थापन होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कृषी उत्पादनांच्या विपणनामध्ये अत्याधुनिक प्रणाली आणण्यासाठी अनेक पावले उचलल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय कृषी बाजार हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ई-नाम पोर्टलवर आतापर्यंत 2 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेली दिली. 18 राज्यातील एक हजाराहून कृषी उत्पन्न बाजार समित्या ई-नाम पोर्टलवर जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.

देशात कृषी क्षेत्रात एक मजबूत विपणन व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. नाफेडबरोबर राज्य, जिल्हा आणि तहसील यांना देखील विपणन व्यवस्थेली जोडावं लागणार असल्याचे अमित शाह म्हणाले. एक वेगळं मॉडेल आपल्याला तयार करावं लागणार असल्याचे शाह म्हणाले. मोदी सरकार प्राथमिक कृषी पतसंस्था बहुउद्देशीय बनवत आहे. मजबूत विपणन प्रणालीसाठी लवकरच एक मॉडेल कायदा आणला जाईल अशी माहिती देखील शाह यांनी दिली.

Team Global News Marathi: