शेतकऱ्यांनी वीजबिल सवलतीचा लाभ घ्यावा – गृहमंत्री

 

मुंबई | सध्या राज्यात वीज मंडळ तोट्यात आले असून राज्यात वीज मंडळाला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने वीज पुरवठाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी सवलतींचा लाभ घेऊन तातडीने वीजबिल भरावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

आंबेगाव तालुक्‍यातील नागापूर येथे श्रीक्षेञ थापलिंग देवस्थान यांच्यावतीने दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी भेट दिली. यावेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते. ग्रामस्थांच्या वतीने वळसेपाटील यांचा सन्मान करण्यात आला.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, बैलगाडा मालकांवरील तसेच आंदोलन संबंधित, यात्रा आयोजन संबंधित शेतकऱ्यांवरील दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येणार आहेत. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंक खात्यात प्रोत्साहनपर. 50 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: