साध्य राज्यात वाढत्या असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायीक आणि हातावरचे पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. तसेच उद्योग, हॉटेल क्षेत्रातील आर्थिक उलाढाल मंदावली होती. याच पार्श्वभूमीवर रुग्णालयातून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा राजकारण सक्रीय होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले.
मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. भाजपने यासंदर्भात शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो, अशी टीका अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
पुढे आणखी एक ट्विट करून भातखळकर म्हणतात की, शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, असे भातखळकर यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
मा. @PawarSpeaks साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो. pic.twitter.com/w1iatu9T43
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2021