शरद पवारांच्या निर्णयाचं महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही – काँग्रेस

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे आज मुंबईत प्रकाशन झाले. दरम्यान या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली.त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं भूकंप आला असून, यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे.

पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली. यावेळी जयंत पाटील शरद पवार यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसले होते.त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. हुंदके देत त्यांनी शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.

दरम्यान यावरच काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जे कोणी नवीन अध्यक्ष असतील ते महाविकास आघाडीसोबत राहिल. त्यामुळे या सर्व गोष्टीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांनी असा निर्णय का घेतलाय? याबाबत सांगणे कठीण आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबद्दल येत असलेल्या बातम्या असतील किंवा त्यांच्या तब्येतीचं कारण असेल. आता याबाबत सांगणे कठीण असून, त्यांची भेट झाल्यावर याबाबत काय ते कळेल. मात्र शरद पवार शेवटपर्यंत राजकीय आणि सामजिक जीवनात सक्रीय राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहेत. पण राष्ट्रवादी पक्षाचे जे कोणी नवीन अध्यक्ष असतील ते महाविकास आघाडीसोबत राहिल. त्यामुळे या सर्व गोष्टीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: