नवी दिल्ली | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आह. आमची कटुता शिवसेनेशी , राष्ट्रवादीशी नाही; सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुधीर मुनगंटीवारांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
भाजप-शिवसेनेत प्रचंड कटुता आहे. तशी कटुता भाजप आणि राष्ट्रवादीत नाही हे नक्की. महाराष्ट्राच्या हितासाठी मोदी आणि पवार यांची भेट झाली असेल तर आनंदच आहे. मोदी-पवार मोठे नेते. त्यांच्यात महाराष्ट्राबाबत राजकीय चर्चा झाली का? हे सांगणं कठीण आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सुरु असलेल्या कारवायांचा राजकीय अर्थ लावणं योग्य नाही, हे या भेटीत मोदीजी पवारांना माहिती देऊन समजावू शकतील.