ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीतही राहुल नार्वेकर यांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना शरद पवारांनी आमदारांना दिली आहे. यानंतर चर्चांना उधाण आलं. यावर आता प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना काही युक्रेन नाही, संजय राऊतांनी शिंदे गटाला सुनावले, विधानसभा अध्यक्षांवरही टीका दरेकर म्हणाले, की शरद पवारसाहेब जे बोलतात, त्याच्या उलटंच घडतं. ते सहा महिन्यात सरकार कोसळेल, असं म्हटले आहेत. तर हे सरकार अनेक दशकं टिकेल. शरद पवारांनी याआधीही मुंबईत येताच बंडखोर आमदार आमच्याकडे येतील, असा दावा केला होता.
मात्र असं काहीही झालं नाही. हे सगळे आमदार आमच्याच बाजूने आहेत, असंही दरेकर म्हणाले. शरद पवार यांच्या दाव्यानुसार ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे.