कोल्हापूर | राज्यातील शेतकर्यांच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राज्य शेततो यांनी आक्रमक भूमिका घेऊन राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या एफआरपी दरावरुन खासदार शरद पवार यांना सुद्धा लक्ष केले आहे. मी आज कोणासोबतही, मी केवळ शेतकऱ्यांच्याजवळ आहे. योग्य वेळ येताच मी माझी भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि एफआरपीच्या तीन तुकड्यांबद्दलच्या मुद्द्यांवरु शरद पवार यांना लक्ष्य केले. आम्ही शरद पवारांचे गुलाम नाही, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटलं.
भाजपला शेतीतला काही कळत नाही, शेतीशी यांचा संबंध नाही, असे म्हणत सरकारने यांची मतं घेतली. जर, पवार मोदींचीच भाषा बोलणार असतील तर अवघड आहे. एफआरपीचे तुकडे करायच्या मुद्दयावर यांनी केंद्र सरकारच्या हो ला हो मिळवला. एफआरपीचे तुकडे शरद पवार पडू देणार नाहीत, असे म्हणतात. केंद्र सरकारच्या रमेशचंद्र समितीनेच तीन तुकड्यातील एफआरपीचा प्रस्ताव का दिला, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
पुढे ते म्हणाले की, कृषीमूल्य आयोग दरवर्षी एफआरपी जाहीर करत असते, मग याचवेळी एफआरपीसोबत एक नोट का दिली, की तीन तुकड्यांमध्ये एफआरपी द्यावी, याची जबाबदारी केंद्र सरकार का घेत नाहीत, असे म्हणत सर्वच राजकीय पक्ष एक असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.