मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना नवीन वर्षाला नाव गिफ्ट दिले होते. यापुढे ५०० चौरस फुटाच्या घरांना घालफला माफ असणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती यावरूनच आता विरोधकांनी थेट महाविकास आहादी आणि सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर निशाणा साधला आहे.
सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबईकरांची आठवण झाली आहे. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णयाला उशीर झाला आहे. आतापासून नव्हे तर वचन दिले त्या तारखेपासून मालमत्ता कर माफ केला पाहिजे. त्यामुळे चार वर्षांचा करही मुंबईकरांना परत करा, अशी मागणी भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी केली आहे.
सरकारने विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचा समाचार घेताना आमदार शेलार म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सूट दिली. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फीमध्ये सवलत दिली. विदेशी दारूला करात ५० टक्के सूट दिली. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. मग मुंबईकरांच्या निर्णयाला का विलंब झाला, असा प्रश्न शेलार यांनी केला.