राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तत्कालीन फडणवीस सरकरमध्ये झालेले फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच तापत सून याच पडसाद आज तागायत राजकीय पटलावर उमटताना दिसून येत आहे. अशातच आता संजय राऊतांचा फोन 2 टप्यात टॅप करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. सत्ता स्थापनेच्यावेळी राऊतांचा फोन टॅप झाला असल्याचे बोलले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस तर संजय राऊतांचा फोन दोन टप्यात टॅप करण्यात आला. एकनाथ खडसे आणि संजय राऊत या दोघांचाही जबाब यावेळी नोंदविण्यात आला आहे. महाविकास आघाडी बनण्याच्या अगोदरच्या काळामध्ये हा फोन टॅपिंग प्रकार घडलेला होता. फोनन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र दुसरीकडे विरोधात बसलेले तत्कालीन भाजपा सरकरने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.