तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना जेलमध्ये पाठवा, कंगना राणावत हिचे अजब विधान !

आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत अनेकदा ट्विट करताना दिसून आली आहे. तसेच तिच्या या ट्विटवर नेटकरी सुद्धा तिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे. भारतातील वाढती लोकसंख्या या विषयावर तिने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

आज वाढत्या लोकसंख्येमुळे देशात लोक मरत आहेत, यावर तिने भाष्य करत वादग्रस्त ट्विट केले आहे. कंगनाने ट्विट केले आहे की, देशात लोकसंख्या सतत वाढत असल्याने लोक मरत आहेत. म्हणून तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठावावा आणि त्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्यावी. असे विधान तिने केले आहे.

तसेच कंगनाने लिहिले की, ‘हे खरे आहे की इंदिरा गांधी निवडणूक हरली आणि नंतर त्यांनाही मारण्यात आले, कारण त्यांना या विषयावर कारवाई करायची होती.कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहेत. अभिनेत्रीच्या या ट्विटवर लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक म्हणण्याला पाठिंबा देत आहेत तर काही त्यांना ट्रोल करत आहेत.

Team Global News Marathi: