सुरक्षा दिली म्हणजे पाळत नव्हे; पटोलेंच्या आरोपांना नवाब मलिक यांचं सडेतोड उत्तर |

 

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माझयावर पाळक ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप लगावला होता. या आरोपानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक म्हणाले, नाना पटोले यांचे आरोप हे माहिती अभावी आहेत. एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असो वा आंदोलन, ती माहिती संकलित करणे हे गृहखात्याचे काम असत. जर नाना पटोले यांना याबाबत अधिक माहिती नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे अशा माजी मुख्यमंत्र्यांना विचारावे असेही मलिक यांनी म्हंटल.

जर त्यांना वाटत असेल की त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तस पत्र त्यांनी गृहखात्याला पाठवावे असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला. सुरक्षा दिली याचा अर्थ पाळत ठेवली असा नाही असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: