तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असे ट्विट भाजपा नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. आता राणे यांच्या टीकेला खुद्ध शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
गुप्त भेटी या दोनशे लोकांसमोर होत नसतात. पण, ज्यांना कोकणाने दोन वेळा नाकारले त्यांनी माझे राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त भेट झाल्याचे ट्विट केले आहे. पण, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. तुमची दखल जनतेने घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी, अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नीलेश राणे यांना टोला लगावला.
तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असे ट्विट नीलेश राणे यांनी केले होते. यावर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. गुप्त भेट घ्यायची असेल तर रत्नागिरीच्या विश्रामगृहात २०० लोकांसमोर भेट का घेईन, असा प्रश्न करतानाच गुप्त बैठक करायची असेल तर नागपूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी करेन, असे ट्विट करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावरील विश्वास उडेल असे जर त्यांना वाटत असेल तर हा बालिशपणा आहे, असेही सामंत म्हणाले.