“सरडा पण रंग बदलत नाही,जितक्या गतीने राज ठाकरे बदलतात” – जितेंद्र आव्हाड

 

‘राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही की, जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला.

गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जातीवाद केल्याचा गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले होते. आज जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले.

जागतिक राजकारणाविषयी राज ठाकरे यांचा अभ्यास आहे असं बोलतात पण महाराष्ट्राच्या राजकारणात बद्दल त्यांना किती माहित आहे हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही, दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहित नाही.

राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची ४,५पुस्तके वाचली तर जातपात काय असतं हे समजेल आणि जात-पातचे जन्मदाते कोण आहेत हेही समजले असते, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरेंना लगावला. ‘जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे, छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आहेत, तटकरे लोकसभेत खासदार आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचा आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी मंडल आयोग महाराष्ट्रात आणला.

Team Global News Marathi: