संजय राऊतांनी भाजपला दिला ‘हा’ गंभीर इशारा म्हणाले की,

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना त्रास देण्यात आला आहे या विषयी संजय राऊत यांनी थेट राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कारवाईवर घणाघाती टीका केली होती. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सुडाच्या कारवाया केल्या जात असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर अशी माहिती मी वारंवार देईल. यानंतर मुंबईत येऊन याबाबद पत्रकार परिषद घेईल, असंही राऊत म्हणाले.

केंद्र सरकारच्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जरा जास्तच सुरू आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर जे चिखल फेकत आहेत त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Team Global News Marathi: