संजय राऊतांच्या वाढलेल्या ईडी कोठडीवरुन भुजबळांचा खोचक टोला

 

पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आहेत असून अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. न्यायलयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आता संजय राऊतांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच, असे सांगत, राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा. ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठीया कमिशनन ओबीसीची संख्या कमी दाखवली. अनेक त्रुटी आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांना संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, अशी मिश्किल टिपण्णी भुजबळ यांनी केली. तसेच छगन भुजबळ यांना संजय राऊतांवर शरद पवार गप्प का, अशी विचारणाही करण्यात आली. यावर बोलताना, असे काही नाही. लोकसभेत पण ईडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादीकडून आवाज उठवला जातो. खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भूमिका मांडत असतात. अनेक विरोधी पक्षांनी हा कायदा राक्षसी असल्याचे म्हटले आहे. हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेला आहे. चिदंबरम यांनीच बनवलाय त्यामुळे भाजपला तरी काय ठेवणार? असे भुजबळ म्हणाले.

Team Global News Marathi: