केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाला राज्यातून पाठींबा देण्यात येत असून शिवसेनेने देखील वेळोवेळी शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
त्यात आज शिवसेना खासदार संजय राऊत गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची भेट घेत असल्याचे त्यांनी बोलून दाखवीले होते. यावर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
‘संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 2, 2021