समीर वानखेडे प्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र’

 

मुंबई | क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या प्रकरणात प्रभाकर साईल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप लागवण्यात आले आहेत. या प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही सईल यांनी केला होता. याचबरोबर सध्या समीर वानखेडेंवर लाचखोरी, जातीचा बनावट दाखला, खंडणी वसुली असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत.

या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असून ते मोदींकडे काय मागणी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: