मुंबई | संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला, असं ठाम विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या एका जागेवर उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावरून आता चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे. मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. पण संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय? शिवसेनेचा तरी काय संबंध? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा.
संभाजीराजेंचा सन्मान म्हणूनच आम्ही त्यांना शिवसेनेच्या कोट्यातली जागा द्यायला तयार झालो, असं सांगताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या कोट्यातली जागा संभाजीराजेंना द्यायला तयार झालो, तो त्यांचा सन्मान म्हणूनच. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? ४२ मतं आम्ही त्यांना द्यायला तयार होतो. आमची अट नाही पण भूमिका एवढीच की तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा. राजकीय पक्षात छत्रपती घराण्यातलं कोणी जात नाही हा समर्थकांचा दावा योग्य नाही