पुणे | मागच्या काही दिवसांपपासून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि डॉ अमोल कोल्हे यांच्यात विकास कामाच्या मुद्द्यावरून वाद होताना दिसून येत आहे. त्यातच आता शिवससेना खासदार संजय राऊत हे एक दिवसाच्या जुन्नर दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा जुन्नर आणि शिरूर मतदार संघात भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे.
राऊत म्हणाले की राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला. काही ठिकाणी फडकवायला पाहिजे होता तो फडकला नाही. आता सरकार काही असलं तरी भगवा फडकला पाहिजे. मला खात्री आहे शिरूर आणि जुन्नर मतदारसंघात भगवा फडकेल. कोणी म्हटलं सत्ता आपल्याकडे नाही. पण मी म्हणतो सत्ता मनगटात असते. शरद आणि शिवाजीराव मनानं आणि मनगटाने भक्कम आहेत.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आज आमच्याकडे आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद नाही. जुन्नरच्या मातीवर प्रेम करणारा मुख्यमंत्री आपला आहे. महाराष्ट्राचा इतिहास इथंच सुरू होतो आणि इथंच संपतो, असं सांगतानाच पुढचे तीन वर्ष निवडणूका येईपर्यंत आपण जे चुकलंय ते आपण मिळवलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.