गेल्या दोन दिवसांपासून मुंबईवर तौक्ते चक्रिवादळाचं संकट घोंघावत आहे. मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है
महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !! https://t.co/rN7drFeiTu— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. या एका ट्विटमुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायं आहे का?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या या ट्विटवरून विविध प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या.
त्यातच आता अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली चाकणकरांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है, महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है, असं चाकणकर म्हणाल्या. यापूर्वीच आधी रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर व्हॅक्सिनवरून टीका केली आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.