दिल्लीमध्ये रिंकू शर्मा या तरूणाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता सामील असल्याचे समोर आल्यानंतर दिली येथील वातावरण चांगलेच तापू लागले होते.
त्यातच आता आम आदमी पक्षाने दिल्लीत खून होणं सर्वसामान्य गोष्ट झाली असून, रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात आपने अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
रिंकू शर्मा यांची व्यावसायिक वादातून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यावरून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. रिंकू शर्माच्या हत्येवरून दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. त्यातच आता आपने या हत्येसाठी अमित शाह यांना जबाबदार धरले आहे.