अंकुर वाढवेची भावनिक पोस्ट वाचा….!

अंकुर वाढवेची भावनिक पोस्ट वाचा….!

अंकुर वाढवे हे नाव महाराष्ट्रातील तमाम रसिकांना चांगलेच परिचयाचे आहे. आपल्या अभिनयाने रसिकांना खळखळून हसविणाऱ्या अंकुरची कहाणी तशी या क्षेत्रात प्रदार्पण करणाऱ्या नवीन कलाकारांना प्रेरणादायी आहे. आज चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे सागर कारंडे, गणेश भारतपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके या बड्या स्टारकास्ट बरोबर आपली वेगळी छाप नक्कीच अंकुरने रसिक प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे.

मात्र अंकुर हा एक उत्तम अभिनेत्याबरोबर उत्कृष्ट लेखक सुद्धा करतो. तसेच त्याच्या फेसबुक वॉलवरून अनेकवेळा वेगवेगळ्या विषयांवर त्याचे लेख रसिकांना वाचायला मिळतात. अशीच एक पोस्ट सध्या अंकुरच्या फेसबुक वॉल वरून त्याने प्रसिद्द केली आहे.

‘मला छोटू म्हणा बुटक्या म्हणा…..’, अशी सुरुवात करत त्याला कित्येकदा ऐकाव्या लागलेल्या तसेच थट्टेचा विषय ठरलेल्या ओळी अंकुरने आपल्या शब्दात मांडल्या आहेत. या ओळी लिहिताना हितपर्यंत पोहचण्यासाठी करावा लागलेल्या खडतर प्रवासाची आठवण नक्कीच त्याने करू दिलेली आहे.

आजच्या समाजात माणसाच्या रंग-रुपावरून त्याची कुवत ठरवली जाते. तसेच त्याच्या कुवतीला जातीचे लेबल तर नक्कीच लागलेले असते. मात्र आज कलेला रंग,रूप आणि जातीपेक्षा त्यात असलेल्या गुणांना जास्त महत्व असते हे अंकुर वाढवेच्या कलेतून सिद्ध होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: