” रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा “

 

संभाजीनगर | भारतीय जनता पक्षच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जन आशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.

भाजपच्या जनशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. संभाजीनगर आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. याच गर्दी प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.

तसंच एमआयएमने गर्दी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असा सवालही जलील यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला विचारला असून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. माझ्याकडे एक व्हिडीओ आला आहे, ज्या व्हिडीओत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कार्यकर्ते स्वागत करताना दिसून येत आहे. यामध्ये दानवेंनी मोठी गर्दी जमवली आहे. तसंच दुसरे मंत्री भागवत कराड यांच्याही जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी होती” असे जलील यांनी यायला सांगितले होते.

Team Global News Marathi: