राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. तसेच अनेकांच्या मागे ED ची चौकशी सुद्धा सुरु झाली होती. त्यातच आता अनिल परब यांच्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमागे शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा हात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यानेही हात घालताना शिवसेना नेत्यासंदर्भातच एक दावा केला आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. तसेच मंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. मग ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे.