राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे, पुन्हा राष्ट्रवादीने साधला निशाणा

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल संविधानिक प्रश्न उपस्थित असताना मागच्या ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारशी रद्द करण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. तसेच राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील ठाकरे सरकारमधील शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या 12 नावाच्या आमदारांची यादी रद्द करण्यात यावी, असे पत्र राज्यपालांना दिले आहे. याबद्दल महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महेश तापसे म्हणाले, ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा उजवा हात म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख असताना त्यांनीच सरकारमध्ये बंड घडवून आणले आणि आता स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे.

वास्तविक राजकारण हे सदभावनेतून झाले… राजकारण विकासाचे झाले… तर सर्वांनाच आनंद आहे. परंतु सूडाचे राजकारण महाराष्ट्रात सुरू झाले आहे ते योग्य नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असे स्पष्ट मतही महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

Team Global News Marathi: