राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”. खरे हिंदुत्व नाही, पुन्हा एकदा नितेश राणेंनी आघाडीवर डागली तोफ

 

मुंबई | एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत, कबरीवर फुले चढवल्याचा फोटो व्हायरल होत आहे. यावरून राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे अशातच आता भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणेंनी ओवीसींना थेट आव्हान देत राज्य सरकारवर सुद्धा बोचरी टिका केली आहे.

आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे. पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळं यावर आता एमआयएमकडून सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

पहिल्या टिव्टमध्ये नितेश राणेंनी लिहिलंय की, “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” तर दुसऱ्या टिव्टमध्ये “या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!” अशी दोन टिव्ट करत त्यांनी राज्य सरकारव सुद्धा निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: