मुंबई ; गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेस नेते राजीव सातव यांचे आज निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात गेल्या २० दिवसांपासून कोरोना संसर्गावर उपचार सुरू होते. सातव यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. अखेर सातव यांची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त काँग्रेसकडून आज ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केले आहे. राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.