रजनीकांत यांचा राजकारणातून काढता पाय, पक्ष केला बरखास्त |

 

अनेक अभिनेता आपल्या उतरत्या वयात समाजसेवेचा वास घेऊन राजकारणात उतरतात. आज दाक्षिणात्य अनेक अभिनेत्यांनी आपल्या पक्ष काढला असून अनिवडणुकीला सामोरे गेले आहे. त्यातच सुपरस्टार राजनिकां यांनी सुद्धा आपला पक्ष काढला होता. मात्र आता त्यांनी स्वतःचा पक्षच बरखास्त केला आहे.

रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करत राजकारणच्या दिशेनं सुरु केलेला प्रवास थांबवला आहे. संघटनेच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रजनीकांत यांनी निर्णय जाहीर केला आहे. भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असं देखील रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याची घोषणा करताना रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करुन ‘रजनीकांत रसीगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’ म्हणून काम करेल, असं जाहीर केलं आहे. २९ डिसेंबर २०२० रोजी रजनीकांत यांनी जाहीर केलं होतं की आपण राजकारणात प्रवेश करणार नाही. पण अलीकडेच त्यांनी राजकारणात येण्याबाबत पुन्हा चर्चा करणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 

Team Global News Marathi: