मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होईल अशी चर्चा रंगली आहे.मात्र, ‘राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील अशी आता काही शक्यता नाही. त्यांच्यासोबत युतीचा चा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणी घेतील, पण आता युतीचा विषय नाही’ असं स्पष्ट उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मनसेसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली.
किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, पुण्यात किमान २०० ठिकाणी निदर्शने व्हायला हवी होती पण पुण्यातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेशिवाय भाजप माहीतच नाही. आपण केवळ नगरसेवक म्हणून केवळ काम करण्यासाठी जन्माला आलो नाही आपण राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांची कानउघडणी केली.
‘माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो. अनेकांना वाटतं मी कधी हिमालयात जातो. मी लक्ष देत नाही. कोल्हापुरात 40 हजारच मत पडली असती तर मला पाय ठेऊ दिला नसता पण तिथे कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केलं आणि यशापर्यंत पोहोचलो, असंही पाटील म्हणाले. पुणे महापालिका निवणुकासप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतील पण राजकारणात एका रात्रीत काहीही होऊ शकतं, असं संकेतही पाटील यांनी दिले.