मोठी बातमी राहुल गांधींना दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून सुरत कोर्टाच्या शिक्षेला स्थगिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही मोठी बातमी आहे. न्यायमूर्ती गवई यांनी राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, राहुल गांधी यांच्या विरोधात महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्यावतीनं कोर्टात अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर, पूर्णेश मोदी यांच्यावतीनं महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना अधिक शिक्षा सुनावण्याचे निकष काय आहेत. त्यांना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकते, असं म्हटलं. याशिवाय त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा अधिकार देखील अबाधित राहिला असता, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं

सूरत कोर्टानं राहुल गांधी यांना २३ मार्चला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यत्व निलंबित करण्यात आलं होतं. राहुल गांधी यांनी त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर राहुल गांधी सुप्रीम कोर्टात गेले होते. तिथं त्यांना दिलासा मिळाला होता.

राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी नफरत के खिलाफ सत्यमेव जयते, जय हिंद अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात तरी न्याय जिवंत आहे, न्याय मेलेला नाही, असं म्हटलं. राहुल गांधी यांना कोणत्या कारणासाठी शिक्षा सुनावली असं म्हटलं.

दरम्यान, राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये केलेल्या एका सभेतील वक्तव्यावरुन पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.

Team Global: