नवी दिल्ली | देशात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या असताना दुसरीकडे इंधनदरवाढ करून मोदी सरकारने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “मोदी सरकारच्या विकासाची ही परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाही तर जास्त ती जास्त मोठी बातमी होते.” असं राहुल गांधी ट्वटिद्वारे म्हणाले आहेत.
मोदी सरकार के विकास का ये हाल है कि अगर किसी दिन पेट्रोल-डीज़ल के दाम ना बढ़ें तो ज़्यादा बड़ी ख़बर बन जाती है!#FuelPriceHike
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2021
या पूर्वीदेखील राहुल गांधी यांनी सातत्याने मोदी सरकारवर टीका केलेली आहे. “काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. पेट्रोल पंपावर बिल घेताना मोदी सरकारने केलेला महागाईचा विकास दिसणार आहे. कर वसुली, महामारीच्या लाटा येत आहेत”, असं ट्विट राहुल गांधींनी या आधी केलेलं आहे. आता राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपने सुद्धा प्रतिउत्तर दिले आहे.
केंद्रीयमंत्री पेट्रोलियम धर्मेंद्र प्रधान यांनी म्हंटले आहे की, “राहुल गांधींनी अगोदर उत्तर द्यावं, त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात इंधन दरात वाढ का आहे? राजस्थान, पंजाबमध्ये का इंधन दर वाढ झालेली आहे? अशी बेजबाबदार वक्तव्य राहुल गांधींच करू शकतात. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांनी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. आज मुंबईत सर्वात महाग पेट्रोल यामुळे आहे की महाराष्ट्राचा कर देशात सर्वात जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे.” असं धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी बोलाताना बोलून दाखवलं आहे.