पुन्हा अशी वक्तव्ये कराल तर…, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांचा इशारा

 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदे गटात सामील झालेले आणि नव्याने पदभार स्वीकारलेले राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चानेदेखील नाराजी व्यक्त केली असून आपल्या वक्तव्यावर माफी मागा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली.

आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावं सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का असा खडा सवाल करत तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा असेही केदार यांनी म्हटले.

‘मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, असा जाबही मराठा क्रांती मोर्चाने विचारला आहे.

मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आम्ही आंदोलन केले असल्याची आठवण केदार यांनी करून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गाजर आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात देखील खंजीर आंदोलन केले होते. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या देखील विरोधात आंदोलन केले होते. अजित पवार यांना जाहीर भाषणात थांबवून ओबीसी मधूनच आरक्षण मागितले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतानाही आम्ही त्यांच्या घरावर आंदोलन केले होते. असेही केदार यांनी म्हटले.

Team Global News Marathi: