पुढील दहा जन्म तुमची सत्ता येणार नाही … ; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

 

:राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. यानंतर भारतीय जनता पक्षावर आणि शिंदे गटातील नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिंदे सरकारमध्ये कृषीमंत्री असणाऱ्या सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी त्यांनी घरात बसून राहिल्याने ठाकरेंच्या हातून सत्ता गेल्याचे विधान त्यांनी केले आहे. इतकच नाही तर पुढील दहा जन्म तुमची सत्ता येणार नाही असं भाकितही सत्तार यांनी व्यक्त केले. आता तुम्ही राजकीय वर्तुळात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मग अडीच वर्ष काय केलं? मुख्यमंत्री म्हणजे छोटं पद नाही. ते किती शक्तीशाली असतं याचा अंदाज आज माझ्यासारखा कार्यकर्ता लावू शकतो. ज्यावेळेस होता त्यावेळेस काही दिले नाही. आता काय देणार? असा उलट सवाल सत्तार यांनी उपस्थित केला.

तुमची सत्ता येण्याचे स्वप्न पुढच्या दहा जन्मांमध्ये पण पूर्ण होणार नाही हे मी सांगतो, अशी टीकाही सत्तार यांनी केली दरम्यान सत्तार यांच्या टीकेला शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले. ही सगळी भाकितं म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते असा प्रकार आहे. त्यामुळे सत्तार उगाच काव काव करु नये, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला.

Team Global News Marathi: