‘प्रकाश आंबेडकर यांनी यापुढे काळजी घ्यावी, खंजीरपासून सुरक्षेसाठी चिलखत घालावे

 

शिंदे-फडणवीस सरकारला टक्कर देण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे असून उद्धव ठाकरेयांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. काळ मुंबई झालेल्या दोन्ही नेत्यांच्या एकत्र संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आलीय युतीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येत आहे.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आगामी सर्व नागरी निवडणुका एकत्रित लढवणार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे असं सांगितले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढे काळजी घ्यावी, खंजीरापासून सुरक्षेसाठी चिलखत घालून फिरावे. असा खोचक सल्ला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. या पूर्वी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला होता.

 

Team Global News Marathi: