प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य शंभर वर्षांपूर्वीचे आहे. त्या काळात वाईट रूढी परंपरा मोडण्यासाठी त्यांनी काय केले ते आताच्या पिढीला कळणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारांतून आमची जडणघड झाली आहे. ढोंग दिसेल तिथे ढोंगावर लाथ मार.. मग काय होईल ते होईल.. अशी शिकवण त्यांनी दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
प्रबोधनच्या शताब्दीनिमित्त केशव सीताराम ठाकरे यांचे लेख असलेले प्रबोधनमधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथाचे शानदार प्रकाशन आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्रीपदावर असताना आपल्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. हा योगायोग आहे. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्रीपद हा बहुमान आहे. पण प्रबोधनकारांचा नातू हे माझ्ये भाग्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:
- माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे
- आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा किती मोठे होते हे कळते. मी काही फार त्यांच्या विचारांचा अभ्यास केला नाही पण त्यांच्या सहवासात शिकलो
- प्रबोधनकार कसे कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. पण मी नातू असल्याने माझ्या वाट्याला सुदैवाने ते आले नाही.
- त्यावेळी आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या.
- आपण माणूस म्हणून पहिल्यांदा जन्माला येतो
- देश हाच धर्म आहे पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे
- लोकशाहीत मत महत्वाचे आहे पण हिंमत सुद्धा लागते.
- पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतीचा विरोधात त्या काळी प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले
- माझे आजोबा नास्तिक नव्हते पण ढोंग त्यांना आवडत नव्हते, ते सरळ लाथच मारायचे
- आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही
- प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशात सर्व राज्यात पोहचवावे त्यासाठी त्याचे भाषांतर झाले पाहिजे
- नवहिंदू प्रकार फार घातक आहे. हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीसारखे होते आहे
- शंभर वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या हस्ते प्रकाशन होते आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे , भाग्याचे आहेहीच भावना बाळासाहेबांवरील फटकारे पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती