नापास झाले म्हणून फडणवीस दिवसा स्वप्न पाहताय, पटोलेंचा सणसणीत टोला !

 

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नापास झाली आहे अशी टीका केली होती आता या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘फडणवीस हे स्वतः नापास झालेले आहे म्हणून ते दिवसा स्वप्न पाहत आहेत. कोण पास कोण नापास हे जनताच ठरवेल’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

महाडमध्ये माजी आमदार लोकनेते स्व. माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाड नगर परिषदेचा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रायगड पालकमंत्री आदिती तटकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल तटकरे, आ.भरत गोगावले, महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप, शोभाताई सावंत, महेंद्र घरत आदी उपस्थित आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला. धक्कादायक! कोरोनामुळे ६ लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला ‘देवेंद्र फडणवीस हे काही परीक्षक नाहीत. ते परीक्षक नसल्यामुळे कोण पास आणि नापास हे ठरवणे त्यांच्या हातात नाही.

Team Global News Marathi: