देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं ‘डोल वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या सरकारच्या चिंतेत भर वाढवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशातील तमाम नागरिकांशी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला होता.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयावर जनतेशी संवाद साधला होता. कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्रतिबंधक नियमाचे पालन सर्वांनी करावे, असं मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात म्हंटल आहे.
या कार्यक्रमा आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत ‘राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘हिम्मत है तो करो – #KisanKiBaat #JobKiBaat’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते.