जनतेनं फेकून दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे तुम्ही आज सत्तेत आहात – तानाजी सावंत

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना ,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद होत असल्याचे चित्रा अनेकवेळा दिसून आले होते. त्यातच इंदापूरचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ओघाओघात केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्र्यांचं मरू द्या, जाऊ द्या, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री आणि सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी सज्जड दम दिला आहे. पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द वापरा. आम्ही स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जीवावर सत्तेत आला आहात. तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं, पण केवळ उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात हे कधीच विसरू नका, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी वक्तव्य करत आहात. तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द आणि भाषा वापरा. तुमच्यात हिम्मत असेल आणि तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा, असं आव्हानही दत्तात्रय भरणे यांना तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

Team Global News Marathi: