परमबीर आरोप प्रकरण : राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात स्वतंत्र याचिका, देणार आव्हान

परमबीर आरोप प्रकरण : राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात स्वतंत्र याचिका, देणार आव्हान

ग्लोबल न्यूज: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी CBI कडे देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राज्य सरकारकडून एक विशेष याचिका दाखल करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्याविरूद्ध मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या कथित खंडणीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशीच्या दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ही याचिका करण्यात आली आहे.

तर अनिल देशमुख यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात धाव घेत स्वतंत्र याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: