“पक्ष सोडून गेले ते कावळे नव्हते, तर ते गद्दार होते, कावळा तरी जागा सोडताना आपली जागा साफ करून जातो, मात्र हे गद्दार जागा घाण करून गेले!” – शर्मिला ठाकरे

 

राज्यात काही महिन्यात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षात प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहेअशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात सुद्धा मागच्या काही महिन्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला होता. आता पक्ष सिडणाऱ्या या पक्षद्रोहींना मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. “पक्ष सोडून गेले ते कावळे नव्हते, तर ते गद्दार होते, कावळा तरी जागा सोडताना आपली जागा साफ करून जातो, मात्र हे गद्दार जागा घाण करून गेले! असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाकेबाज तसेच निष्ठावंत नगरसेवक संजय तुर्डे ह्यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभास प्रभागातील शेकडो महिलाभगिनिंनी विरोधकांच्या नाकावर टिच्चून तोबा गर्दी केल्यामुळे कार्यक्रमाला भव्यदिव्य रुप आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. शर्मिलावहिनींनी पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांची शाब्दिक क्षेपणास्त्रे डागत यथेच्छ धुलाई केली.

“पक्ष सोडून गेले ते कावळे नव्हते, तर ते गद्दार होते, कावळा तरी जागा सोडताना जागा साफ करून जातो, मात्र हे गद्दार जागा घाण करून गेले!” असे मत व्यक्त केले. नगरसेवक संजय तुर्डे यांच्या पत्नी मिनल तुर्डे यांनी देखील आपल्या भाषणात विरोधकांना खुले आवाहन करत निर्भीडपणे फटकेबाजी केली.

Team Global News Marathi: