नवी दिल्ली | देशातील सर्वात जुना असणारा काँग्रेस पक्ष अनेक अडचणींचा सामना करत आहे. तसेच अनेक जुने सहकारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टीदेत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. परंतु, आता निडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसने काय करायला पाहिजे? याबाबत भाष्य केले आहे.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सल्ला देताना सांगितले की, काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर पक्षात काही बदल करावे लागतील. शिवाय 2024 मध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर काय केले पाहिजे? याबाबतही प्रशांत किशोर यांनी यावेळी सांगितले. “काँग्रेसने एक पक्ष म्हणून जो आराखडा तयार केला आहे त्यासह निवडणुकीदरम्यान लोकांपर्यंत पोहण्याची पद्धत आणि लोकांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीत मूलभूत त्रुटी आहेत.” असे प्रशांत किशोर म्हणाले.
“पक्षाच्या पातळीवर काँग्रेस खूप खाली घसली आहे. सर्वात आधी काँग्रेला निर्णय प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे. शिवाय स्थानिक नेत्यांना ताकद द्यायला पाहिजे. याबरोबरच निर्णय प्रक्रीयेला केद्रीयकृत केले नाही पाहिजे. इतर नेत्यांनाही निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. काँग्रेसला पुढे विजय मिळवण्यासाठी पक्षात खूप बदल केले पाहिजेत. याबरोबरच जो कोणी अध्यक्षपदी निवडला जाईल तो पूर्ण वेळ अध्यक्ष असला पाहिजे असा सल्ला सुद्धा दिला आहे.