ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास, आरक्षणावरून फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

 

मुंबई | ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि श्वास आहे, ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. मोर्चे काढता मग अहवाल का तयार करत नाही? अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं आरक्षण रखडलं असा आरोप भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

ओबीसी भाजपचा श्वास आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या करण्यात आली, अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्यानं ओबीसी आरक्षण रखडलं, याचा रिपोर्ट तयार करण्यासाठी कुणीही तयार नसल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच ठाकरे सरकार फक्त झोपा काढतंय, टाईमपास करत आहे. जाणीवपूर्वक हे आरक्षण राज्य सरकारने रखडवल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारनं व्हॅटमध्ये जी कपात केली ती फसवी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले, ”महाराष्ट्र सरकारनं मे महिन्यात एप्रिल-फूल केलं” इंधनाच्या केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर अधिक आहे, इंधनाच्या करावरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा फडणवीसांनी दिला आहे

Team Global News Marathi: