मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. त्यात स्थानिक पातळीवर अनेकदा झाल्याचे सुद्धा समोर आले होते. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता या निर्णयामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उघडपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकशाही पद्धतीने जाऊन विरोध करू’ असं म्हणत आंदोलनाचा इशारा आहे. तसंच, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार नाही, असंही पटोलेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्ह आहे.
महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेतला होता. पण, या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार केले जातील, असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. परंतु, महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत, यावर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.